रत्नागिरी : कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातील उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (रविवारी) रत्नागिरीत व्यक्त केली.
