चिपळूण : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही, असे आदेश देऊनही चिरनेर (जि. रायगड) येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने गोळीबार केला. त्याला अडवताना मामलेदार केशव जोशी त्याच्या गोळीला बळी पडले, पण त्यामुळे शेकडो सत्याग्रहींचे प्राण वाचले, असे प्रतिपादन संध्या साठे-जोशी यांनी केले.
