परशुराम घाटातून आता दिवसा अवजड वाहनांची एकेरी वाहतूक; रात्री घाट पूर्ण बंद

रत्नागिरी : दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू ठेवण्याचे आणि रात्री घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (१४ जुलै) जारी केले आहेत. हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

परशुराम घाट आता १३ जुलैपर्यंत बंद राहणार

परशुराम घाट आता १२ जुलैच्या मध्यरात्री २४ वाजेपर्यंत म्हणजेच १३ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक १० जुलैपर्यंत बंद राहणार

पाच जुलै रोजी पुन्हा एकदा दरड खाली येऊन परशुराम घाटातली वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आता ती १० जुलैपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहे.

अधिक पावसाची शक्यता वर्तविल्यास परशुराम घाट बंद राहणार

रत्नागिरी : पावसाळा सुरू होत असून पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील परशुराम घाट तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे.