रत्नागिरी : दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू ठेवण्याचे आणि रात्री घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी आज (१४ जुलै) जारी केले आहेत. हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.