रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये क्लस्टर विद्यापीठ होण्याची क्षमता आहे. त्यामुळे संस्थेने त्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाला पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (चार मे) रत्नागिरीत केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.