कोकणात तीन नव्या जेटींना परवानगी; दोन रत्नागिरीत, तर एक सिंधुदुर्गात

कोकणात तीन नव्या जेटी उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून, महाराष्ट्र सागरी प्राधिकरणाकडून सीआरझेडसंदर्भातील मंजुरीही मिळाली आहे.

जयगड बंदर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करणार; वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठीही पाठपुरावा सुरू : नीतेश राणे

कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातलं जयगड बंदर हे एक महत्त्वाचं केंद्र (हब) म्हणून विकसित केलं जाणार आहे. त्याला कोकणाला राज्याच्या अन्य भागाशी जोणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचीही जोड दिली जाईल. यामुळे कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असं प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी आज (११ सप्टेंबर) जयगडमध्ये केलं.

महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढल्यामुळे देशाची उत्पादनघट कमी होण्यास मदत

मुंबई : देशाच्या सागरी मत्स्योत्पादनात २०२४मध्ये दोन टक्के घट झाली आहे; मात्र महाराष्ट्राचे मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. राज्याचे मत्स्योत्पादन वाढल्यामुळे देशाच्या मत्स्योत्पादनातील घट कमी होण्यास हातभार लागला आहे.

मिरकरवाडा बंदराचा विकास १८ नव्हे, १२ महिन्यांत पूर्ण करू : नीतेश राणे

रत्नागिरी तालुक्यातल्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा समारंभ आज (२७ जुलै) राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे, राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा; राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय

मुंबई : राज्यात मत्स्यव्यवसायाला आजपासून (२२ एप्रिल २०२५) कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्याचा राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना फायदा होणार आहे.

रत्नागिरीत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

अवघ्या १२ तासांच्या कालावधीत रत्नागिरी मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर कारवाई केली आहे.