वाचकांची संख्या वाढवण्यासाठी घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल : प्रकाश देशपांडे

‘सध्याच्या काळात वाचन कमी होत चालले आहे. वाचकांची संख्याही कमी होत आहे. माणसे एकमेकांशी बोलण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. संवाद केवळ मोबाइलवरील संदेशाद्वारे होतो. ही परिस्थिती बदलायची असेल, तर घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल. त्यांना ते मोफत वाचायला द्यावे लागतील आणि त्यामधून वाचनाची सवय वाढवावी लागेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले.

राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानवर ग्रंथपाल किरण धांडोरे यांची निवड

रत्नागिरी : राजा राममोहन रॉय प्रतिष्ठानच्या मुख्य समितीवर येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे यांची तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.