केबीबीएफच्या उद्योजकांनी दावोसमध्येही करार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

कऱ्हाडे ब्राह्मण बेनव्होलंट फाउंडेशनने (केबीबीएफ) आयोजित केलेल्या ग्लोबल मीटमध्ये आलेल्या उद्योजकांनी दावोस येथेही सामंजस्य करार करावा, असे उद्दिष्ट ठेवावे. म्हणजे खऱ्या अर्थाने ग्लोबल मीटचा उद्देश साध्य होईल. तसेच ही ग्लोबल मीट मराठी उद्योजकांचे आयडॉल लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या जयंतीदिनी म्हणजे २० जून रोजी मराठी उद्योजकता दिनी दरवर्षी आयोजित करावी, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

प्लास्टिकच्या पर्यायाचा व्यवसाय

प्लास्टिकचा वापर थांबवायला हवा, यात कोणतीच शंका नाही. मात्र अचानक हा वापर थांबविता येणार नाही. त्याला कोणता तरी तितकाच समर्थ पर्याय दिला गेला पाहिजे. हा पर्याय उपलब्ध करणे मोठे आव्हानाचे आहे. हेच आव्हान स्वीकारले गेले पाहिजे. त्याबाबत अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. पर्यावरणस्नेही प्लास्टिकची निर्मितीही केली जात आहे. मात्र प्रदूषणकारी प्लास्टिकएवढे ते किफायतशीर नाही. सहज परवडणारे नाही. म्हणूनच त्यावर संशोधन आणि त्यातून निर्मिती झाली पाहिजे.

मानसिक ताणांचा, उदासीनतेच्या कारणांचा उलगडा दासबोधात – समीर लिमये

रत्नागिरी : माणसाला येणाऱ्या ताणांच्या, उदासीनतेच्या आणि नैराश्याच्या कारणांचा उलगडा दासबोधात आहे. दासबोधाचे विचारपूर्वक वाचन केले, तर यशस्वी नक्की होता येईल, असे प्रतिपादन दासबोधाचे अभ्यासक आणि कीर्तनकार समीर लिमये यांनी केले.

‘केबीबीएफ’च्या ग्लोबल मीटमध्ये अशोक घाटे यांना उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : केबीबीएफ म्हणजेच कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिक आणि उद्योजक ज्ञातिबांधवांच्या मेळाव्यात आज (१४ जानेवारी २०२३) रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक अशोक घाटे यांना त्यांच्या अमृतमहोत्सवाचा योग साधून उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.