आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनासाठी तळवडे सज्ज

तळवडे (ता. राजापूर) : राजापूर लांजा नागरिक संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी तळवडे नगरी सज्ज झाली आहे.

क्रांतीज्योत फेरीने आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाची वातावरणनिर्मिती

लांजा : तळवडे (ता. राजापूर) येथे होणार असलेल्या आठव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या वातावरणनिर्मितीसाठी राणी लक्ष्मीबाई क्रांती ज्योत फेरी काढण्यात आली. तिचा प्रारंभ कोट (ता. लांजा) येथे झाला. सरपंच सौ निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले.