करोना संसर्ग थोपविण्यासाठी राज्यात आता ‘ब्रेक द चेन’; संपूर्ण नियमावली

मुंबई : करोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रिपरिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता मिशन बिगिन अगेनच्या ऐवजी ब्रेक द चेन आदेश लागू राहणार आहेत. रात्रीची संचारबंदी आणि दिवसभर जमावबंदी असे या मोहिमेचे स्वरूप असेल. सोमवार ५ एप्रिलच्या रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत त्याची अंमलबजावणी केली जाईल.

Representational

रत्नागिरीसह जिल्ह्यातील नऊ शहरांत दुचाकीवरून एकट्यालाच जाता येणार

करोनाच्या प्रतिबंधासाठी रत्नागिरी जिल्ह्यात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी नागरी (शहरी) भागांसाठी आहे. रत्नागिरीसह खेड, चिपळूण आणि राजापूर, नगरपालिकांचे क्षेत्र, तसेच मंडणगड, दापोली, गुहागर, देवरूख आणि लांजा या नगरपंचायतीच्या क्षेत्रांमध्येही जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. या सर्व शहरांमध्ये दुचाकीवरूनही एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. दुचाकीवर दुसरी व्यक्ती दिसली, तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला शिक्षा केली जाईल.