टेक अ चान्स : नातेसंबंधांवरील विश्वासाचे महत्त्व अधोरेखित

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जालन्याच्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेने टेक अ चान्स हे नाटक सादर केले. योगायोगाने व्हॅलेंटाइन डेला शाश्वत प्रेमाचे महत्त्व सांगणारे हे नाटक सादर झाले.