करोनाच्या काळात वस्तू घरपोच पोहोचवण्याचा व्यवसाय; देवरूख, रत्नागिरीच्या तरुणांचा उपक्रम

रत्नागिरी : करोनाच्या बेरोजगारीच्या काळात देवरूख आणि रत्नागिरीतील काही तरुणांनी आपले ज्ञान, शिक्षण किंवा सामाजिक चौकटीची तमा न बाळगता वेगळ्या वाटेने जाऊन रोजगार शोधला आहे. त्यातील काही तरुण इंजिनीअरिंगचे विद्यार्थी आहेत, तर काही जण पौरोहित्य करणारेही आहेत. सध्याच्या काळाची गरज ओळखून त्यांनी घरोघरी वस्तू आणि विविध प्रकारचा माल पोहोचविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

सावंतवाडी तालुक्यात क्वारंटाइन तरुणाचा मृत्यू; कारण अस्पष्ट

सावंतवाडी : क्वारंटाइन असलेल्या एका तरुणाला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात ही घटना घडली. मुंबईतील मालाडहून कालच (२६ मे) आपल्या गावात आलेला हा तरुण शाळेत क्वारंटाइन होता. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.