पर्यटन परिषदेचे फलित

पहिल्या चार वर्षांच्या परिषदांमध्ये पर्यटनाचे पर्यटनाच्या विकासाचे अनेक मुद्दे मांडले गेले असले तरी पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र आले पाहिजे, रस्त्यांसारख्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत आणि आपला व्यवसाय वाढविला पाहिजे, या विचारापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. यावर्षीची परिषद मात्र काहीशी वेगळी ठरली, असेच म्हणावे लागेल. कारण याच परिषदेत अनाहूतपणे मांडल्या गेलेल्या एका मुद्द्यावर एकदम एक कोटीच्या निधीची घोषणा झाली. तेच या परिषदेचे फलित होते.

‘वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल’

रत्नागिरी : वानर आणि केल्ड्यांवर उपाय काढा, कोकण समृद्ध होयल, अशा संगमेश्वरी बोलीतील खणखणीत शब्दांत या वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची कथा आणि शेतकऱ्यांची व्यथा लोककलाकार सचिन काळे यांनी मांडली.