रत्नागिरी : करोनाच्या काळात नियोजनाचा निधी प्राधान्याने करोनासाठी खर्च झाला. मात्र आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे येत्या काळात संपूर्ण निधी देऊन रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यात येतील. त्यात रस्ते आणि पर्यटनाला अधिक असेल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.