रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता.
रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात (२०२५) भात आणि नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून यासाठीचा खर्च केला जाणार आहे.
यंदा रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अभूतपूर्व प्रमाणात पाऊस पडला आहे; मात्र शेतकऱ्यांनी भात आणि नाचणीच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. एरव्ही पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होते. त्यामुळे पेरणीचा हंगाम गेलेला नसून, यापुढे चार-पाच दिवस पाऊस थांबून ऊन पडल्यावर भातपेरणी करणे सोयीचे ठरेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सिंधुदुर्गनगरी : सध्या करोनाच्या संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे; मात्र खरीप हंगाम जवळ येत असल्याने कोकणाच्या शेतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताच्या लागवडीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरीप भात लागवडीचे नियोजन, तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती करताना घायची काळजी याविषयी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नुकतेच ध्वनिचर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.