रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये त्यांचे बंधू किरण सामंत आणि दापोलीत योगेश कदम हे शिवसेनेतर्फे विजयी झाले. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम जिंकले. फक्त गुहागरची जागा भास्कर जाधव यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मिळाली आहे.