देवराई/देवरहाटीच्या जमिनीवरील शासनाचा हक्क कमी करून त्या पुन्हा देवस्थानांच्या नावे करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घ्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आज (१० मार्च) रत्नागिरीत जयस्तंभ येथे घंटानाद आंदोलन केले.