रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून १३ जूनपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.