रत्नागिरी : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या आणि वाढण्याची शक्यता असल्याच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा उपाय सांगितला जात आहे. ही रोगप्रतिकारशक्ती किती आहे, याचे मापन करणारे केंद्र रत्नागिरीत सुरू झाले आहे. करोनाच्या काळात हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.