रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथील विद्यामंदिरचे माजी प्राचार्य, ग्रामसुधारक सेवा समितीचे माजी अध्यक्ष तसेच आदर्श शिक्षक विश्वास तथा भाई सामंत (वय ८६) यांचे ६ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील एक कष्टकरी कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.