मालवणी संस्कृतिसंवर्धनाचा प्रयोग

विविध बोलीभाषा हेही मराठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या भाषा संवर्धित झाल्या, तरच प्रमाण मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवायला मदत होणार आहे. या दृष्टीने बोलीभाषांचे संवर्धनही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या बोलीभाषामधील कार्यकर्ते दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना आणखी बळ प्राप्त झाले आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या साहित्यभूमीमध्ये झालेल्या मालवणी साहित्य संमेलनाकडे पाहायला हवे.

‘घुंगुरकाठी’ संस्थेचे कार्य प्रेरणादायी; स्वयंसेवी संस्थांचे जाळे ही आजची गरज : अरुण दाभोलकर

आडाळी (दोडामार्ग) : ‘‘घुंगुरकाठी’ या स्वयंसेवी संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून, त्याच्या अनुकरणाची गरज आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही गावांचा विकास साधता येतो. विविध उपक्रमांमधून गावाला एकत्र आणणाऱ्या अशा सेवाभावी संस्थांचे जाळे निर्माण होण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांनी आडाळी (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे केले.