रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोना प्रतिबंधासाठी आठ जुलैपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे; मात्र घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरीनिमित्ताने एकटे राहावे लागणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये, यासाठी लॉकडाउनच्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी थोडा बदल केला आहे.
