कोकण पर्यटनाचा कस्तुरीमृग

नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमुळे जो काही आढावा घेतला गेला, त्यातूनच कोकणातील सागरी किनाऱ्यांच्या नव्या पर्यटन क्षेत्रांची निश्चिती करायला हवी, तसा आराखडा तयार करायला हवा. त्यातून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच कोट्यवधी रुपये खर्च करून साजरा झालेला नौदल दिन कोकणाच्या दृष्टीने सार्थकी लागेल.

दुबईची संधी साधणार कशी?

मुळात ग्राहकांपर्यंत उत्पादने पोहोचविण्यासाठी स्थानिक स्वरूपातच साखळी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यासाठी नेमके काय करावे लागते, याची माहिती उत्पादकांना नसते. त्यामुळे राज्य आणि देशपातळीवरही उत्पादने पोहोचू शकत नाहीत. अशा स्थितीत जागतिक पातळीपर्यंत ती कशी पोहोचणार, हा प्रश्नच आहे. दुबईतील मीटच्या निमित्ताने गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने, तसेच त्यांच्याकरिता प्रयत्न करणाऱ्या स्थानिक उद्योजकांनी त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.