नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमुळे जो काही आढावा घेतला गेला, त्यातूनच कोकणातील सागरी किनाऱ्यांच्या नव्या पर्यटन क्षेत्रांची निश्चिती करायला हवी, तसा आराखडा तयार करायला हवा. त्यातून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच कोट्यवधी रुपये खर्च करून साजरा झालेला नौदल दिन कोकणाच्या दृष्टीने सार्थकी लागेल.