सायबर संस्कारांना प्रारंभ

आजच्या युगात सायबर संस्कार या सतराव्या संस्काराची गरज आहे, हे पटवून देणारा एक कार्यक्रम रत्नागिरीत अभियंता अक्षय फाटक यांनी अलीकडेच केला. मोबाइलमुळे फसवणुकीचे जे अनेक गुन्हे घडतात, त्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले. राजापूर तालुक्यातील एका गावाने याबाबतचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. वयाची १८ वर्षे होईपर्यंत आपल्या मुलाला पालकांनी वैयक्तिक मोबाइल घेऊन देऊ नये, असा निर्णय या गावात घेण्यात आला आहे.

सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात; म्हणूनच सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज : डॉ. अक्षय फाटक

समाजात आज सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यांचे प्रकारही वेगवेगळे आहेत; मात्र सायबर गुन्हे आपल्या चुकीमुळेच घडतात. आपण दक्ष राहिलो आणि न घाबरता परिस्थितीला तोंड दिले, तर हे गुन्हे घडणार नाहीत. म्हणूनच आजच्या युगात सायबर संस्कार या १७व्या संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले.

मोबाइलद्वारे फसवणूक टाळण्यासाठी ‘सायबर संस्कार’; रत्नागिरीत होणार मार्गदर्शन कार्यक्रम

समाजात सध्या ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, उच्चभ्रू व्यक्तींची सायबर फसवणूक केली जात आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी समाजावर सायबर संस्कार होण्याची गरज आहे. याकरिता या विषयातील तज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांचा सायबर संस्कार कार्यक्रम रत्नागिरी नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.