रत्नागिरी : पीएम किसान निधीच्या नवव्या टप्प्याच्या वितरणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील काही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यामध्ये रत्नागिरीतील देवेंद्र झापडेकर या शेतकऱ्याचा समावेश होता. पंतप्रधानांशी थेट संवाद झाल्याने हा शेतकरी भारावून गेला आणि या संवादातून आपल्याला आणखी नवे काही करण्याचे प्रोत्साहन मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.