फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Continue reading

कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरणाची मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.

Continue reading

कोकणाचा उल्लेखही नाही

मोठा गाजावाजा होऊन जी ट्वेंटी शिखर परिषदेची पहिली बैठक मुंबईत पार पडली. मुंबईसह महाराष्ट्राची औद्योगिक तसेच पर्यटनदृष्ट्या भरभराट यावी, यासाठी या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील सह्याद्री पर्वतासह विविध ठिकाणांचा उल्लेख झाला, पण त्यात महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाचा साधा उल्लेखही झाला नाही.

Continue reading

नुसतेच बुडबुडे नकोत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यापाठोपाठ ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. बऱ्याच काळानंतर मुख्यमंत्री रत्नागिरीत येणार असल्यामुळे त्याबद्दलचे कुतूहल आहेच, पण आधीच्या घोषणेला पूरक अशी उद्योजकतेच्या दृष्टीने कोणती नेमकी घोषणा ते करणार आहेत, याबाबतची उत्सुकता आहे.

Continue reading

विघ्नहर्ता आला, रस्त्यांचे विघ्न कायम!

ते रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता नाही. लोक कंटाळतात आणि तक्रार करायचे थांबतात. नंतर त्यांनाही त्याची सवय होते आणि लोकांच्या अल्पस्मृतीचीच ही सवय शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांना माहीत असते. अनेक वर्षे हे असेच सुरू आहे. यापुढेही तसेच चालणार आहे. विघ्नहर्ता आला. त्याच्यासोबत सण साजरा करून गणपती गावाला जाईल, चाकरमानी मुंबईला परततील. रस्त्यांमधील खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे.

Continue reading

मोफत नको, सुखकर प्रवास हवा

एसटीतून ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याची ही घोषणा होती. अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असल्यामुळे त्यावर टीका होण्याची शक्यता नाही, पण अशी लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षाही इतर अनेक बाबतीत सरकारने लक्ष द्यायला हवे होते.

Continue reading

1 2