माझी वसुंधरा अभियान

प्रत्येकाने आपापल्या पातळीवर पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रयत्न करायला हवा. शहरे आणि ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात आलेले माझी वसुंधरा अभियान त्यासाठी उपयुक्त आहे. मात्र त्यातील उपक्रम केवळ अभियानाच्या आणि स्पर्धेच्या वर्षापुरते राबवून काहीही उपयोग नाही. या उपक्रमांचे महत्त्व पटले असेल तर हे उपक्रम दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले पाहिजे. तरच अभियान राबविण्यात काही अर्थ आहे.

महाराष्ट्रातील आठ हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहितीपुस्तिका पोस्टाकडून प्रकाशित

महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे.

आता सर्वांना ‘वृक्षरक्षक’ बनावे लागेल : धीरज वाटेकर

चिपळूण : दिवसेंदिवस मनुष्य अधिकाधिक वृक्षतोड करतो आहे. मनुष्याने वृक्षतोड करू नये, वृक्षसंवर्धन करावे यासाठी आपल्याला सर्वांना वृक्षरक्षक बनावे लागेल, असा कानमंत्र लेखक आणि पर्यटन-पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कोकणला पर्यटन नियामक प्राधिकरण हवे : धीरज वाटेकर

खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

देवराई, देवक वृक्षांबाबत काम व्हायला हवे : धीरज वाटेकर

चिपळूण : देवराई, देवक वृक्ष आणि ४०-५० वर्षांहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री संबोधून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम झाले पाहिजे, अशी विनंती पर्यावरण आणि पर्यटन विषयातील कार्यकर्ते लेखक धीरज वाटेकर यांनी केली.

‘ब्लू मॉरमॉन’ आले हो अंगणी

भारतात ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतर सर्वांत मोठे फुलपाखरू असल्याचा मान मिळालेले, महाराष्ट्राचे ‘राज्य फुलपाखरू’ ‘ब्लू मॉरमॉन’ १० एप्रिल २०२२ रोजी चिपळूण येथे दिसले. त्याचे छायाचित्र टिपल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना.