रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे पाच टक्के दिव्यांग आहेत. त्यातील काहींना परिस्थितीमुळे दोन वेळचे अन्नही खायला मिळत नाही. अशांकरिता आस्था सोशल फाउंडेशन ‘सन्मानाने अन्न’ योजना येत्या एक जानेवारीपासून राबविणार आहे. त्यासाठी देणगीदारांनी पुढे यावे, अशी हाक फाउंडेशनच्या संस्थापक सौ. सुरेखा जोशी-पाथरे यांनी दिली आहे.
