करोनाच्या कालावधीत सुदृढ आरोग्याचे महत्त्व प्रत्येकाला कळले. तसेच आरोग्य यंत्रणेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी शहराजवळच्या नाचणे गावातील काही तरुणांनी सर्वसामान्य, गरजू नागरिकांसाठी केवळ १० रुपयांत आरोग्य तपासणीचा उपक्रम ‘आपली माणसं’ या नावाने सुरू केला आहे.