आयुष्याच्या संध्याकाळी दोघा निराधारांच्या जीवनात उगवली पहाट

रत्नागिरी : हातखंबा येथील निराधारांचा आधारवड ठरलेल्या माहेर संस्थेत आगळावेगळा विवाह सोहळा झाला. संस्थेत चार वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मोहन गुरव आणि सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या सुप्रिया पाडळकर या निराधार जोडप्याचा अनोखा विवाह पार पडला आणि त्यांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली.