२२ डिसेंबरपासून राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी आज (२१ डिसेंबर) बैठक घेतली. राज्यात उद्यापासून (२२ डिसेंबर) महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पाच जानेवारी २०२१पर्यंत अशी संचारबंदी लागू राहील.

विनामास्क फिरणाऱ्या २५ टक्के लोकांमुळे समाजाला धोका : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील ७० ते ७५ टक्के लोक बाहेर फिरताना मास्क वापरताना दिसतात. उरलेले २५ टक्के लोक विनामास्क फिरत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजाला धोका होऊ शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

करोना गेलेला नाही, आपण धोक्याच्या वळणावर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ‘महाराष्ट्राने करोनाची रुग्णसंख्यावाढ रोखली असली, तरी आपण सगळे धोक्याच्या वळणावर आहोत. मला पुन्हा कोणताही लॉकडाउन करायचा नाही; पण सर्वांनी स्वयंशिस्त पळून मास्क लावणे, हात धुणे, आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पाळणे खूप गरजेचे आहे,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२२ नोव्हेंबर) केले. ते समाजमाध्यमावरून राज्यातील जनतेला उद्देशून बोलत होते.

नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी : दापोली दौऱ्यात आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दापोली : ‘करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन नागरिकांनी करणे आवश्यक आहे. लॉकडाउनच्या काळात गेले अनेक दिवस नागरिक घरामध्ये होते. परंतु घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळावी,’ असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले. आज (२० नोव्हेंबर) दापोली उपजिल्हा रुग्णालयास त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.