आकाशवाणीचा संकोच

आकाशवाणी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राज्यसभेचे सदस्य असले तरी कोकणाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकेंद्रीकरणाकरिता लक्ष घालणे अपेक्षित आहे. वेळीच धोरणात्मक सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाऐवजी स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ येऊ शकेल.

मोबाइल व्यसनमुक्तीची गरज

मुलांचा जास्त वेळ मोबाइलवर जात असल्यामुळे डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत, तो भाग वेगळा. पण अभ्यासाच्या नावाखाली अभ्यासाचा मोजका वेळ वगळता मुले आभासी जगात जास्त रममाण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील जगण्याकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. क्रीडांगणाकडे तर मुलांनी साफ दुर्लक्ष केले आहे, पण क्रीडांगणाची गरज नसलेल्या इतर शारीरिक कसरतीही मुले टाळू लागली आहेत.