वेंगुर्ल्यात समुद्रतळाशी युद्धनौकेमध्ये संग्रहालय; देशातील पहिल्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ

आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि त्याभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून, याची मुहुर्तमेढ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (१० जून) रोवण्यात आली.

पर्यटन अणि शांतता विषयावर २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन

रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझमद्वारे चालू वर्षाकरिता पर्यटन आणि शांतता हे जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य असून त्याअनुषंगाने पर्यटन दिन साजरा होणार आहे.

कोकण टूर सर्किटमधून डिसेंबरमध्ये चार मोफत सहली

अलिबाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कोकण टूर सर्किटमधून येत्या डिसेंबरमध्ये चार मोफत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोकण टूर सर्किट सुरू

महाड : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा कोकण विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ महाड येथे झाला. या टूरमध्ये चवदार तळे आणि गांधारपाले लेण्याचे दर्शन घडविले जाते.

रत्नागिरीत २४ जणांनी घेतले सहल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण

रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानने प्रथमच आयोजित केलेल्या ट्रॅव्हल, टुरिझम गाइड ट्रेनिंग म्हणजेच सहल मार्गदर्शनाचे प्रशिक्षण २४ जणांनी घेतले. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मदतीने शांतीनगर येथील कार्यालयात दहा दिवसांचे हे प्रशिक्षण पार पडले.

पर्यटन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कोकणातील तरुणांसाठी प्रशिक्षणाची संधी; एमटीडीसीतर्फे इंटर्नशिप कार्यक्रम

मुंबई : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्राला नवी उभारी देणे अत्यावश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) इंटर्नशिप कार्यक्रम सुरू करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पर्यटन उद्योगाला असलेला वाव लक्षात घेता या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी इंटर्नशिपचा हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. इच्छुकांनी येत्या २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत.