रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या स्थितीनुसार, खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे.
Tag: Naringi River
जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने महामार्ग बंद
रत्नागिरी : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने आज सायंकाळी (नऊ जुलै) धोक्याची पातळी ओलांडली. आज सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने खेड शहराजवळून वाहणाऱ्या या नदीच्या पुरात वाढ झाली. खेड शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या नारिंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे.