कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवे कडक निर्बंध

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

विवाह आणि अन्य कार्यक्रमांना फक्त ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकणार; राज्यात नवे कोविड निर्बंध लागू

राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.