ध्यास : गाव जगवण्याचा, जागवण्याचा

जुन्या आणि चांगल्या प्रथा-परंपरांचे जतन करणे, सध्याच्या काळात चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे आणि उद्याच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे बीजारोपण करणे हे उद्दिष्ट राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या आठ ग्रामीण साहित्य संमेलनांपासून ब्रीद म्हणूनच अंगीकारले आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच शिपोशीत झालेल्या नवव्या संमेलनातही आले.

सोडून दिलेला सुसंस्कृतपणा

मुळात अशी असभ्य भाषा वापरण्याची वेळ का येते, हाच प्रश्न आहे. एकमेकांबद्दल आकस असू शकतो. परस्परांची मते एकमेकांना न पटण्याची स्थितीही अनेक वेळा निर्माण होते. वेगवेगळ्या पक्षांची मते आणि धोरणे वेगळी असल्यामुळे विरोधातल्या पक्षाची आणि नेत्यांची धोरणे एकमेकांना पटण्याची शक्यता नसते, पण अत्यंत सभ्य, सुसंस्कृत भाषेमध्ये हे एकमेकांना सांगितले जाऊ शकते.