कोकण रेल्वे, महामार्ग चौपदरीकरणातून उद्योजकता वाढावी – नारायण राणे

रत्नागिरी : कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातील उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (रविवारी) रत्नागिरीत व्यक्त केली.

कुसुमताई पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात मूलभूत कार्य करावे : बाळ माने

रत्नागिरी : कुसुमताई सहकारी पतसंस्थेने १७ वर्षांत २५ कोटींच्या ठेवीपर्यंत मारलेली मजल कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने पंचविसाव्या वर्षापर्यंत २५० कोटींचे उद्दिष्ट ठेवावे. पण त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रात वेगळे आणि मूलभूत सामाजिक कार्य पतसंस्थेने उभे करावे, असे आवाहन रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी येथे व्यक्त केले.