वनौषधी प्रकल्प कोकणातच ठेवण्यासाठी केंद्राकडे गाऱ्हाणे

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्रीय आयुष मंत्रालयाचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लॅन्ट कोकणाबाहेर जाऊ देऊ नये, असे गाऱ्हाणे रत्नागिरीतील भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. विलास पाटणे यांनी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना घातले आहे. याबाबतचा पाठपुरावा करण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.