हिंदूराष्ट्र म्हणजे भारतातील नवफॅसिझम – डॉ. भालचंद्र मुणगेकर

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : हिंदूराष्ट्र हा भारतातील नवफॅसिझमचा आविष्कार आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रत्नागिरीत भरलेल्या पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनात व्यक्त केला.

गांधी विचार मरणार नाहीत : अभिजित हेगशेट्ये

रत्नागिरी : महात्मा गांधीजींनी आपल्या प्रत्येक कृतीतून नैतिकतेचा संदेश दिला. त्यांची हत्या झाली असली तरी त्यांचे विचार कधीही मरणार नाहीत. त्यांचे विचार भारतापुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण विश्वाला गांधी विचाराने व्यापून टाकले आहे, असे प्रतिपादन नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी केले.