महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इंदूर येथील नाट्य भारती संस्थेने काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक हे नाटक सादर केले. स्वतःपुरते जगू नका. तुमच्या जगण्याचा इतरांनाही उपयोग करून द्या, असा संदेश नाटकाने दिला आहे.