मुंबई : कोकणच्या सुपीक मातीतून पिकत असलेल्या, जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा सुगंध आता थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये दरवळणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत पहिल्यांदाच ३० एप्रिलपासून दोन दिवसांच्या हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.