अक्षय्यतृतीयेपासून दिल्लीत हापूस आंबा महोत्सव; कोकण मेव्याचेही खास आकर्षण

मुंबई : कोकणच्या सुपीक मातीतून पिकत असलेल्या, जगभर प्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्याचा सुगंध आता थेट दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये दरवळणार आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत पहिल्यांदाच ३० एप्रिलपासून दोन दिवसांच्या हापूस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन हजार डझन रत्नागिरी हापूस आंबे लंडनच्या बाजारात

यंदाच्या गुढीपाडव्याला युरोपीयांना, तसेच तेथील मराठी माणसांनाही रत्नागिरी आणि देवगड येथील हापूस आंबे उपलब्ध होणार आहेत. २५ आणि २६ मार्च रोजी रत्नागिरी हापूस आंब्यांच्या पहिल्या दोन बॅचेसमधून दोन हजार डझन आंबे लंडनला रवाना झाले आहेत.

तीन कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी : ‘हापूस अॅट युवर होम’ या योजनेअंतर्गत मुंबईसारख्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या ३ कोटी ग्राहकांपर्यंत हापूस पोहोचविण्याचे रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे प्रयत्न आहेत, अशी माहिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली.