पावस : ‘स्वराभिषेक’च्या बालकलाकारांनी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांच्या केलेल्या बहारदार गायनामुळे स्वामींच्या जन्मोत्सवात साक्षात स्वरांचा अभिषेक श्रोत्यांनी अनुभवला. कार्यक्रमातील दोन अभंगांना यातीलच कलाकारांनी संगीतबद्ध केले होते, हे विशेष.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
पावस : ‘स्वराभिषेक’च्या बालकलाकारांनी स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांच्या केलेल्या बहारदार गायनामुळे स्वामींच्या जन्मोत्सवात साक्षात स्वरांचा अभिषेक श्रोत्यांनी अनुभवला. कार्यक्रमातील दोन अभंगांना यातीलच कलाकारांनी संगीतबद्ध केले होते, हे विशेष.
रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित श्रीमत संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्राजक्ता काकतकर (ठाणे), तन्वी मोरे (रत्नागिरी) आणि महेंद्र मराठे (सिंधुदुर्ग) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळाले. ज्येष्ठ गायिका विदुषी आशाताई खाडिलकर यांनी अंतिम स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
रत्नागिरी : पावसचे श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ आणि रत्नागिरीतील सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमत संजीवनी गाथा’ राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल नुकताच जाहीर झाला.
वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्राबल्य असताना, रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावात १२९ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेच्या रूपाने ज्ञानज्योत पेटवली गेली ती सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी. त्या वेळची सामाजिक परिस्थिती पाहता ही घटना म्हणजे क्रांतिकारीच म्हटली पाहिजे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण शाळेची माहिती देत आहेत त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता कुर्ध्यातल्याच राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असलेले उदय श्रीकृष्ण फडके…