मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडलं नाही, वादळात लोटलं!

मुख्यमंत्री हवेतून आले, काही मिनिटं जिल्हाधिकारी कार्यालयात बसले. पत्रकार परिषदेला उभे राहिले आणि निघून गेले. तौते चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी आपल्या धावत्या दौऱ्यात घेतला. आपण कोकणवासीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं, पण असंख्य प्रश्नांच्या चक्रीवादळात कोकणवासीयांना लोटून देऊन ते पुढे निघून गेले.

करोनाबाधितांच्या शोधासाठी आता भिस्त फॅमिली डॉक्टरवर

रत्नागिरी : ग्रामीण भागात पसरत चाललेल्या करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातील फॅमिली डॉक्टरांची राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे. देशभरातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे.