स्वच्छ भारत सर्वेक्षणात रत्नागिरीला देशपातळीवर दहावे स्थान, वेंगुर्ले पंधराव्या स्थानावर

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपालिका एक लाख लोकसंख्या गटात पश्चिम विभागात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवर दहावा क्रमांक मिळवत स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणारी नगरपालिका ठरली आहे. वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) नगरपालिकेने या स्पर्धेत पंधरावे स्थान पटकावले आहे.

आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, पण आता आम्हाला विचारतो कोण?

मुंबई : करोनाप्रतिबंधक लॉकडाऊनमुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तीन ३ महिने मुंबईत अपुऱ्या जागेत राहावे लागलेल्या चाकरमान्यांची घुसमट आता वाढली आहे. रीतसर परवानगी घेऊन कोकणात येऊ इच्छिणाऱ्या कोकणवासीयांची मोठी निराशा झाली आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.