रत्नागिरी : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपालिका एक लाख लोकसंख्या गटात पश्चिम विभागात सर्वप्रथम आली असून, देशपातळीवर दहावा क्रमांक मिळवत स्वच्छतेचा सलग तिसऱ्या वर्षी पुरस्कार प्राप्त करणारी नगरपालिका ठरली आहे. वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) नगरपालिकेने या स्पर्धेत पंधरावे स्थान पटकावले आहे.