रत्नागिरीतील नऊ गावे आदर्श म्हणून विकसित करणार : उदय सामंत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, महसूल सेवा पंधरवडा आणि ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचं उद्घाटन आज पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झालं.

शेतीच्या सर्व समस्यांवर उपाय ठरेल अशा बांबूची लागवड कोकणात फायद्याची; लवकरच राज्याचे पहिले बांबू धोरण

‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

गावातल्या मुलांना रोजगार देणाऱ्या कंपनीविरोधात ग्रामसभा फक्त आपल्याकडेच होते : पालकमंत्री डॉ. सामंत

‘आपल्या गावातल्या मुलांना रोजगार देणारी कंपनी येत असेल, तर त्याच्या विरोधामध्येदेखील ग्रामसभा होते. हे जगामध्ये कुठे घडत असेल तर ते फक्त आपल्याकडे घडते. ग्रामसभा विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत. स्वच्छतेसाठी झाल्या पाहिजेत. प्रकल्प असण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला पाहिजे. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. सरपंचांनी आपली ताकद विधायकदृष्ट्या वापरून, अख्ख्या गावाला घेऊन काम केले, तर सगळी बक्षिसे आपण मिळवू शकतो,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे उदय सामंत यांचे निर्देश

बँकेचे शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करत असतील, तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (२८ जून) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२३मध्ये केवळ १२ ते १५ टक्के आंबा उत्पादन; राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी : उदय सामंत

रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या समस्यांबाबत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज (१२ एप्रिल २०२३) आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्र्यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्य सरकार आंबा बागायतदारांच्या पाठीशी असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली.