कोमसापच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाच्या अलीकडे झालेल्या निवडीसाठी झालेली प्रक्रिया आणि अशा तऱ्हेच्या विविध कारणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता मुळातच उतरती कळा लागलेल्या या साहित्यिक चळवळीला अत्यंत हानिकारक आहे. आधीच कोमसापपासून अनेक जण फारकत घेऊ लागले आहेत. ती प्रक्रिया आणखी वेगाने होईल आणि कोमसाप म्हणजे एक नावापुरती साहित्यिक संस्था ठरेल.