कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प होणार नाहीत; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’

वेंगुर्ल्यात समुद्रतळाशी युद्धनौकेमध्ये संग्रहालय; देशातील पहिल्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ

आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेत पाण्याखालील संग्रहालय आणि त्याभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉकजवळ हा प्रकल्प होणार असून, याची मुहुर्तमेढ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (१० जून) रोवण्यात आली.

घोणे काष्ठशिल्प म्युझियम, हॉटेल ‘आजीची आठवण’चा प्रारंभ

कोलाड (रायगड) : कोकणातील कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘ग्लोबल कोकण आर्ट व्हिलेज’च्या उपक्रमाची आणि ‘घोणे काष्ठशिल्प म्युझियम’ व ‘हॉटेल आजीची आठवण’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची सुरुवात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोलाड (जि. रायगड) येथे पार पडली.

मुंबईतून तीन तासांत रत्नागिरी आणि साडेचार तासांत सिंधुदुर्गात आणणाऱ्या रो रो जलसेवेचा लवकरच प्रारंभ; क्रूझ किनारपट्टीवर दाखल

रत्नागिरी : ‘रस्ता, रेल्वेसोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार प्रयत्नशील असून, त्याचाच भाग म्हणून लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होतानाच नवा अध्याय राज्यात सुरू होईल,’ अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास मंत्री नीतेश राणे यांनी दिली.

कोकणात गटशेती होण्याची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन

‘कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातलं शेतीक्षेत्र छोटं आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवलं पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे,’ असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं.