रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून मिऱ्या येथील मानसी मनोज पेजे या महिलेने समाधान व्यक्त केले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून मिऱ्या येथील मानसी मनोज पेजे या महिलेने समाधान व्यक्त केले.
रत्नागिरी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ झाला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा केंद्रांचा समावेश असून सहा महिन्यांत अकराशे तरुणांना कौशल्य विकासाची संधी मिळणार आहे.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
नवी मुंबई : मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म हा विचार रुजवायला हवा. महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे. पुरस्कार मोठाच असतो. कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिल्याने हा त्या कार्याचा गौरव आहे, असे उद्गार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांनी काढले.
कोल्हापूर : आरोग्य बाजारात विकत मिळत नाही. ते स्वतःलाच कमवावे लागते. आजच्या मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळेही शरीराचे भरून न येणारे नुकसान होत आहे. ते दुर्लक्षून चालणार नाही. आठवड्यातून किमान एक दिवस मोबाइलचा उपवास अमलात आणावा, असे आवाहन जागतिक कीर्तीचे ख्यातनाम डॉ. हिमतसिंह बावस्कर यांनी केले.
कोल्हापूर : सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव समारंभाच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित “सुमंगलम विचार संपदा” या पुस्तकाचे प्रकाशन झाले.