नवी मुंबई : लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विकास योजना राबविताना सुसंवादाचे वातावरण ठेवले, तर मोठे कार्य उभे राहते. म्हणूनच कोकण विभाग शासकीय विकास योजना राबविताना राज्यात सर्व क्षेत्रात अग्रेसर असतो, असे प्रतिपादन कोकण विभागाचे महसूल आयुक्त विलास पाटील यांनी केले.