मुंबई : जागतिक वारसा दिनी (१८ एप्रिल) कोकणवासीयांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. कोकणातील सुमारे १० हजार वर्षांपूर्वीचा वारसा असलेली कातळशिल्पे आणि छत्रपती शिवरायांनी बांधलेले सागरी व डोंगरी किल्ले यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश होण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणामार्फत (ASI) सादर केलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ आणि ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्त्वत: स्वीकार करण्यात आला आहे.