रानभाज्यांवर प्रक्रियेच्या दृष्टीने हवं संशोधन; व्यावसायिक उपयोगासाठी करावेत वेगळे प्रयोग : उदय सामंत

‘रानभाज्यांचे गुणधर्म लक्षात घेता, त्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत. त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्यासंदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं,’ अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे पंधरावा श्रावण कीर्तन सप्ताह

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्याचे औचित्य साधून कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन सप्ताहाचे हे सलग पंधरावे वर्ष आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.

पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार इक्बाल मुकादम यांना प्रदान

दापोली : साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणिवांचा सुरेख संगम घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम यांना पहिला ‘पंडित खावर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाकावाटे ब्रेन ट्यूमर काढणारे न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान ठरतेय वरदान; रत्नागिरीत १७ मे रोजी विशेष शिबीर

ठाण्यातील सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत ब्रेन ट्यूमरच्या १००हून अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे मेंदू/कवटी न उघडता अचूकपणे शस्त्रक्रिया करता येत असल्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. मणक्याच्या विकारांवरही याद्वारे उपचार करता येतात. सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयीचे (न्यूरॉलॉजी अँड स्पाइन) मोफत वैद्यकीय शिबीर रविवारी, १७ मे २०२६ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.

दापोलीत ९-१० मे रोजी समर सायक्लोथॉन

दापोली : दापोलीत येत्या ९ आणि १० मे रोजी समर सायक्लोथॉन आयोजित करण्यात आली आहे.