रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातून राज्यातील सर्वाधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. राज्यातील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून १ लाख ८६ हजार ५९६ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक ५४ हजार २७७ पिल्लांचा समावेश आहे.